Thursday, 3 July 2014

विठुमाउली आता साउली सर्वांची

संत नामदेव विठू माउली किती साधी भोळी सर्वाप्रती आत्मभाव असणारी आहे या विषयी म्हणतात "भाजी भाकरीचा हां देव काळी लंगोटी हाती काठी बोले महारची थेट मराठी " सर्व सामान्य   बंधुंची भाषा तो बोलतो त्याला काहीच अनाकलनीय वा सोवळ ओवळ असूच शकत नाही 

             हिंदू धर्मात पूजा आर्चना ,धार्मिक विधि यांचे आधिकार ब्राम्हण ,गुरव जाती समुहाना हजारो वर्षापासून वंशपरंपरागत पध्दतीने दिले गेले आहेत . हे ऐका आर्थान महर्षी मनुंने याना रिझर्वेशनच दिल आहे.यातूनच श्रेष्ट कनिष्ट आशा जातिभेदानी आख्खा सनातन धर्म पोखरला गेला. यातून आलेल्या उच्चनिचतेमुळे आपल्यासारखाच जिताजागता माणूस गावकुसाबाहेर ठेवला .आपल्या घरात कुत्री मांजर खुशाल स्वयंपाक घरापर्यंत जात पण या समाजातील स्वच्छतेच काम करनारया या भावंडाना "अस्पृश्य ठरवून उंबरयाच्या बाहेरच  हजारो वर्ष उभ केल गेल . ज्ञानेश्वरानी हिंदू धर्माच्या तत्वज्ञानातुन लिहिलेल "पसायदान " हे विश्वाची उद्गघोषणा व्हावी अस आहे "वसुधैव कुटुंबकम " हे विश्वच ऐक कुटुंबाप्रमाणे वागावे हा विचार  येथील विविध जातीपातीतुन आलेल्या ऋशी मुनि  साधु संतानी या देशाला दिला .आकाशातील पक्षी ,मुके पशु व इतकच काय पाण्यातील माशाची काळजी घेणारे विचार सांगितले गेले .पण ज्यानी धर्माचा आर्थ समजाऊन सांगावा त्यानीच स्वार्थी उच्चनीच असा बुरसटलेला प्रतिगामी विचार मांडला तेव्हा कर्णाला देखिल म्हणाव लागल "दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरष:" भगवान श्रीकृष्णानी गुण व कर्मावरूनच माणसाच लहान मोठपण ठरत हे गीतेत सांगीतल .परोपकाराची काम करणे म्हणजे पूण्य तर परपीडा देण हे खर पाप हे सांगुन देखिल  खोटया पापपुण्यात समाज गुरफटवला गेला त्यामुळे आज मोठया दुःखान म्हणावस वाटतय "हिंदू धर्माचे विचार उच्च असले तरी आचार नीचच राहिला "

     आज राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आशा अनेक संघटनामार्फ़त हिंदू धर्म म्हणजेच मानवता धर्म हां मुळ साधु संतानी दिलेला  आर्थ प्रत्यक्ष सकारणेसाठी अनेक प्रयत्न करत आसतो पण झारीतिल शुक्राचार्यामुळे संघाच खर चित्र आजअखेर समाजासमोर आलच नाही हे दुर्दैव .साखर गोड आहे हे जस प्रत्यक्ष खाल्याशिवाय समजत नाही तसच संघ विचाराच आहे तो प्रत्यक्ष आनुभवावा लागेल .
    नाशिकच "श्री शंकराचार्य न्यास व रा.स्व. संघ धर्म जागरण यांच्या आशाप्रकारच्या  एकजात, एकवर्ण  हिंदू समाज निर्मितीच्या प्रयत्न करनारे  कार्यास भारतीय धनगर परिषदेच्यावतीने  हार्दिक शुभेच्छा !
    या निमित्ताने मा आन्नासाहेब डांगे
अध्यक्ष देवस्थान समिति व मंदिर समिति   यांच्या असा निर्णय राबवणेच्या कठोर निर्धाराला लाख लाख सलाम !

No comments:

Post a Comment